मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टेस्ट सिरीज (IND VS ENG) खेळवली जात आहे. या सिरीजचा तिसरा सामना राजकोट या ठिकाणी खेळवला गेला होता. या सामन्याच्या 4 थ्या दिवशी टीम इंडियाने एक हाती विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर 434 धावांनी विजय मिळवला आहे. यासह सिरीजमध्ये भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
राजकोटच्या सौराष्ट्र स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टेस्ट सिरीजमधील तिसरा सामना पार पडला. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा युवा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्ध द्विशतक ठोकलं. सामन्याच्या चौथ्या दिवशी यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सरफराज खान यांनी केलेल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर भारताने 430 धावा केल्या आणि इंग्लंडला इंग्लंडला विजयासाठी 500 हुन अधिक धावांचे आव्हान दिले होते.
या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी इंग्लडचा संघ मैदानावर उतरला. परंतु टीम इंडियाच्या गोलंदाजांनी त्यांच्या फलंदाजांना जास्त काळ मैदानावर टिकू दिले नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांपैकी रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतले. तर कुलदीप यादवने 2 तर जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनने प्रत्येकी 1 विकेट घेऊन इंग्लंडच्या संघाला अवघ्या 122 धावांवर ऑल आऊट केले. टीम इंडियाचा राजकोट येथील तिसऱ्या सामन्यात 434 धावांनी विजय झाला असून हा भारताचा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ritesh Deshmukh : काका पुतण्याचं नातं कसं असावं? रितेश देशमुखांनी दिलं उदाहरण
Onion Export Ban : मोठी बातमी! केंद्र सरकारने अखेर कांद्यावरील निर्यातबंदी उठवली
Concentration : एकाग्रता कमी पडतीय तर करा ‘हा’ व्यायाम; झटपट दिसेल बदल
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये मिनीबसचा भीषण अपघात
Supriya Sule : ‘हा भातुकलीचा खेळ नाही’; बारामतीच्या लढतीवरुन सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
Amravati Accident News : अमरावतीमध्ये भीषण अपघात ! चौघांचा मृत्यू तर 10 जण जखमी
Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत होणार मोठा बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद