मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राजकारण तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबपर पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना ओबीसी नेत्यांकडून विरोध होत आहे. या सगळ्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील भाष्य केले आहे. यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला होता. त्यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे ?
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आपल्याला वाटेल तेव्हा कधीही उठावं आणि विधानं करावीत. अशा पद्धतीनं वक्तव्य करणाऱ्यांवर फार बोलू नये. पण, भाजपाची मदत करायची, असेल तर उघडपणे करावी. आडून मदत करण्यात काहीही अर्थ नाही,” असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
“राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 मध्ये झाली. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातींचा द्वेष निर्माण करण्याचं काम सुरू झालं. प्रत्येकाला आपली जात आवडते. त्यामागे अनेक कारणे असतात. खाद्य संस्कृती हे एक कारण आहे. पण, कुणी इतर जातीचा द्वेष करत नाही. हे राष्ट्रवादीने सुरू केलं. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांच्याकडून जातीय द्वेष केला जात असल्याचं मी 1999 नंतर ठाण्यात सांगितलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार होत आहे. राज्यात जातीवाद वाढला आहे. माझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे. मी कधी जातपात पाहिली नाही,” असे राज ठाकरे म्हणाले होते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Indian Army : भारतीय लष्कराची जम्मू – काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 5 दहशतवादी ठार
Yavatmal News : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकाची निर्घृणपणे हत्या; यवतमाळमधील घटना
Yavatmal News : शेतात आलेल्या महावितरणच्या अभियंत्याला शेतकऱ्याकडून मारहाण