मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले संजय गायकवाड ?
उद्धव ठाकरे गटासोबत असताना तत्कालीन महाविकास आघाडीसरकरामध्ये एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. यावेळी नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.या बाबत एक बैठक शंभूराजे देसाई यांच्या कडे सुरू होती. यावेळी शिंदे यांना झेड प्लस सिक्युरिटी देण्याचे ठरले होते.
त्याचवेळी देसाई यांना उद्धव ठाकरे यांचा फोन आला आणि एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सिक्युरिटी देऊ नका असे सांगितले. याचा अर्थ काय होतो. नक्षलवाद्यांच्या धमकीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा उद्धव ठाकरे यांचा कट होता असा खळबळजनक दावा संजय गायवाड यांनी केला आहे. त्यामुळे आम्ही वेगळे होण्याचे पाऊल उचलले नसते तर शिंदे आज जिवंत नसते असेदेखील संजय गायकवाड म्हणाले.