पुणे : विद्येचे माहेरघर ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात विद्यार्थी असुरक्षित झाल्याच्या घटना घडत आहे. टिळक रोड सदाशिव पेठ परिसरत एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर एका तरुणाने भर दिवस कोयत्याने वार केल्याची घटना प्रसिद्ध असताना त्याच परिसरात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तीन गरदुल्यांनी वार केल्याची घटना बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास घडले आहे.
या प्रकरणी तीन आरोपींना विश्रामबाग पोलिसांनी पानमळा परिसरातून अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन तासात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1) आदित्य उर्फ आदी जीवन गायकवाड ( वय 21 रा. सर्वे नं 131/01)आम्रपाली बुद्धीविहारजवळ, पानमळा वसाहत सिंहागड रोड पुणे)
2) साहिल उर्फ ब्लॅकी शंकर वाघमारे (वय 23 रा. सर्वे नं 131/01) आम्रपाली बुद्धीविहारजवळ, पानमळा वसाहत सिंहागड रोड पुणे)
3) अनिकेत उर्फ ऑन्डी संग्राम सरोदे ( वय 23 रा. सर्वे नं 131/01) आम्रपाली बुद्धीविहारजवळ, पानमळा वसाहत सिंहागड रोड पुणे) असे या आरोपींच नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचे मित्र सुभाष शेवाळे व ओम विलास भिलारे यांच्या सोबत खजिना वीर परिसरातून रात्री उशिरा लायब्ररी मधून घरी जात असताना, शक्ती स्पोर्ट समोर पांढऱ्या रंगाचे ऍक्टिव्ह गाडीवर आलेल्या तीन आरोपीनी पैकी एकाने कॉलर पकडून गाडी जवळ घेऊन गेला आणि गाडीवर ठेवलेला लोखंडी कोयता फिर्यादीच्या डोक्यात घालून त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्रयत्न केला. म्हणून त्या तीन आरोपींना विरोधात गुन्हा दाखल आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहे.