Aurangabad News : घरच्यांनी गावी सोबत न नेल्याने मुलाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

2382 0

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये (Aurangabad News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पालकांनी आपल्या मुलाला गावी जाताना सोबत नेलं (Aurangabad News) नाही म्हणून मुलाने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. तिसगावच्या आदर्शनगरमधील म्हाडा कॉलनीमध्ये सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. सौरभ विठ्ठल मिसाळ (वय 17 वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, आदर्शनगर, तिसगाव) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
दोन दिवसांपूर्वीच सौरभचे वडील सुट्टीवर आले होते. तर काही महत्वाच्या कामानिमित्त पत्नी आणि 12 वर्षीय मुलीला सोबत घेऊन ते 11 ऑगस्टला नांदेडला गेले होते. या वेळी सौरभने सुद्धा सोबत येण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, पालकांनी सौरभला घरीच बसण्यास सांगितले होते. सौरभची मावशी घराशेजारीच राहते. त्यामुळे सौरभच्या जेवणाची जबाबदारी मावशीकडे होती. दरम्यान, घरात एकटा असलेला सौरभ बऱ्याच वेळापासून घराबाहेर आला नाही म्हणून त्यांनी त्याला आवाज दिला. पण, कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने सौरभच्या मावशीने खिडकीतून डोकावून पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.

सौरभ विठ्ठल मिसाळ याने केंद्रीय विद्यालयातून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले असून, वसंतराव नाईक विद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होता. सोबत सौरभ हा नीटची तयारी करत असल्याने एका खासगी क्लासेसमध्ये शिक्षण घेत होता. दरम्यान सौरभची इच्छा असूनही पालकांनी त्याला गावी सोबत घेऊन न गेल्याने त्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!