कल्याण : मुलांना घेऊन जाताना दुसऱ्या पत्नीशी पतीने वाद घातला. याच वादातून तीन मेहुण्यांनी मिळून आपल्या दाजीची हातोडीने वार करून हत्या (Murder News) केली आहे. यानंतर त्यांनी एका रिक्षातून अपहरण करत दाजीचा मृतदेह (Murder News) नदीत फेकला. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या घटनेची नोंद करून संशयित तिन्ही मेहुण्याना पोलिसांनी अटक केली आहे. इरशाद शेख, शोहेब शेख, हेमंत बिचवाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शेहबाज शेख (वय 26) असे मृत दाजीचे नाव आहे.
काय घडले नेमके?
मृत शेहबाज हा टिटवाळा नजीक बल्याणी गावात राहत होता. तर त्याची दुसरी पत्नी मुमताज शहाड भागातील बंदरपाडा परिसरात राहत आहे. मुमताज हिचा आदी निकाह झाला असून पहिल्या पतीपासून तिला तीन मुलं आहेत. तर मृतक शेहबाज हा तिचा दुसरा पती म्हणून गेल्या साडेचार तिच्या सोबत राहत होता. मृत शेहबाजपासून मुमताजला दोन मुलं झाली आहेत. हीच दोन मुलं घेऊन जाण्यासाठी मृतक शेहबाज हा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुमताज राहत असलेल्या घरी आला. मात्र मुलं घेऊन जाण्यास मुमताजने विरोध केल्याने पती पत्नीमध्ये वाद झाला. याच वादातून तीन मेहुण्यानी मिळून शेहबाजला बेदम मारहाण करत (Murder News) हातोडीने प्रहार केले.
यानंतर त्याला जखमी अवस्थेमध्ये तिघांनी मिळून घराबाहेर खेचत आणत रिक्षात जबरदस्तीने बसवून घेऊन गेले. विशेष म्हणजे तीन मेहुण्यामध्ये हेमंत बिचवाडे हा मुमताजच्या आईवडिलांनी दत्तक घेतलेला मुलगा असल्याचे समोर आले. दरम्यान शुक्रवारी रात्री 10 वाजल्याच्या सुमारास मुमताज ही पती बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी खडकपाडा पोलीस ठाण्यात आली होती. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेहबाज बेपत्ता असल्याची नोंद करून तपास सुरू केला असता, सायंकाळच्या सुमारास तीन मेहुण्यानी मिळून बेदम मारहाण दाजीला जबरदस्तीने रिक्षात घेऊन गेले. असे पोलीस पथकला समजताच पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास तिघांना ताब्यात घेतले. यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता या तिघांनी आपला गुन्हा मान्य करत शेहबाज ला कल्याण मुरबाड रोड वरील पांजरपोळ नजीक नदीत फेकल्याचे सांगितले. या तिघांनी ज्या ज्या रिक्षातून अपहरण केले ती रिक्षा पोलिसांनी जप्त केली असून पुढील तपास करत असल्याची माहितीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.