सातारा : साताऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये खालकरवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत विहिरीवर विद्युत कनेक्शन (Shock ) घेण्यासाठी वीज वाहक तारा ओढण्याचे काम सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह (Shock ) सुरू झाल्याने एका वायरमनला आपला जीव गमवावा लागला आहे तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
ऋषीकेश प्रकाश कांबळे (वय 27, रा. केसे पाडळी ता. कराड ) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर या घटनेत संजय रामचंद्र वीर (वय 51), अमित महादेव कारंडे (वय 30) दोघे राहणार केसे पाडळी, ता. कराड, तन्मय रविंद्र अडकड (वय 24, रा. आडुळ ता. पाटण) हे जखमी झाले असून त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रविवारी रात्री उशिरापर्यंत उंब्रज पोलीस ठाण्यात या घटनेचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते, तर वायरमन, अधिकारी व कंत्राटदार यांच्यात कम्युनिकेशन नसल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे.
उंब्रज येथील महावितरण कार्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या चरेगाव- खालकरवाडी गावच्या हद्दीत खाजगी कॉन्ट्रॅक्टरद्वारे विद्युत पोल उभे करून त्यावरून तारा ओढण्याचे काम सुरू होते. खालकरवाडी येथील डोंगर पायथ्याला शनिवारी सायंकाळी काम सुरू असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येथे नेमणूक असलेल्या वायरमनने कामगार विद्युत (Shock ) पोलवरुन खाली उतरले की नाही याची खात्री न करताच या लाइनचा वीज प्रवाह सुरू केला. त्यामुळे खांबावरील तारांमधून प्रवाह लागल्याने खांबावरील ऋषीकेश कांबळे या युवकाचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले. या घटनेमुळे महावितरण कंपनीचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे.