नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तलावावर फिरण्यासाठी गेलेल्या 5 जिवलग मित्रांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये दु:खाचं वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे नागपुरात (Nagpur News) मोठी खळबळ उडाली आहे. पाच मित्र मोहगाव झिल्पी इथे रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तलावात पोहोयला गेले होते. चौघेही पट्टीचे पोहणारे नव्हते. तरीही एकमेकांच्या मदतीने पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी उतरले.
यावेळी त्यांनी तलावाच्या काठावर थोडावेळ घालवला. मग पोहण्याच्या नादात पुढे गेले. यातील तलावाच्या काठावर थोडावेळ घालवला. मग पोहण्याच्या नादात पुढे गेले. यादरम्यान खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात बुडाले. या चौघांना वाचवण्याची धडपड करणारा पाचवा मित्रही दुर्दैवाने बुडाला. ऋषिकेश शंतनू, राहुल, प्राजक्त आणि वैभव अशी बुडून मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे आहेत.
NIA Raid : मुंबई-पुण्यात NIA आणि पोलिसांची मोठी कारवाई; 5 ठिकाणी टाकला छापा
या पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या पाचही जणांना पोहण्याचा मोह आवरला नाही आणि ही दुर्घटना घडली. पावासाच्या दिवसांमध्ये अशा ठिकाणी नको ते धाडस करणं त्यांच्या जीवावर बेतले आहे. या घटनेमुळे नागपुरात (Nagpur News) खळबळ उडाली असून नको ते धाडस न करण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे.