सध्या सोशल मीडियावर नांदेडमधील महिती अधिकार कार्यकर्ते असलेल्या विलास शिंदे यांनी अभिनेता अजय देवगणला (Ajay Devgan) लिहिलेले पत्र व्हायरल होताना दिसत आहे. या पत्रामध्ये शिंदे यांनी ‘जंगली रम्मी’ (Junglee Rummy) या ऑनलाइन गेमची जाहिरात करणाऱ्या अजय देवगणला (Ajay Devgan) तुम्ही स्वत: हा गेम खेळता का? तसेच या गेममधून तुम्ही किती पैसे कमावले? असा प्रश्न विचारला असून त्याची माहिती द्यावी अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
Kuljit Pal Passed Away: बॉलिवूड अभिनेत्री रेखाला पहिला ब्रेक देणाऱे निर्माते काळाच्या पडद्याआड
अनेक तरुण झाले कर्जबाजारी
“अजय देवगण सप्रेम नमस्कार व राम राम. आपण एक अतिशय उत्तम अभिनेता आहात. आपले अनुकरण करणारे महाराष्ट्रात लाखो नवतरुण आहेत. ही तुमच्यासाठी अभिमानाची व तेवढीच जबाबदारीची गोष्ट आहे. आजकाल सोशल मीडियाचा वापर अनेक तरुण करतात. तरुणांना चांगली दिशा देण्याचे काम आपल्यासारख्या अभिनेत्याने सोशल मीडियावरुन केले पाहिजे. पण सोशल मीडियावर आपली जंगली रम्मी या ऑनलाइन गेमची जाहिरात पाहून अनेक तरुणांना हा गेम खेळण्याची जणू सवयच लागली आहे. याच सवयीमुळे अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत,” असे विलास शिंदे म्हणाले आहेत.
@ajaydevgn स. नमस्कार राम राम pic.twitter.com/n8NZTjsfrW
— vilas shinde (@vilas641) June 20, 2023
या गेमवर काही राज्यांनी घातली बंदी
“अनेक तरुणांना प्रश्न पडला आहे की आपण जंगली रम्मी हा ऑनलाइन गेम खेळून आजपर्यंत किती पैसे जिंकले आहेत? तसेच या जाहिरातीचा उद्देश काय आहे हे महाराष्ट्रातील तरुणांना सांगितलं पाहिजे. हेच जाणून घेण्याची तरुणांना इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही (Ajay Devgan) फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून हे सर्व सांगावं. या गेमवर काही राज्यांनी बंदीसुद्धा घातली आहे. मात्र तुम्ही या खेळाची जाहिरात करत आहेत असे विलास शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे.