Team India

Team India : टीम इंडियाने फायनलमध्ये बांग्लादेशाचा धुव्वा उडवत आशिया कपवर कोरले नाव

1276 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाच्या ( Team India ) महिला संघाने स्वतःच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. वुमन्स इमर्जिंग आशिया कप 2023 वर टीम इंडियाने आपले नाव कोरले आहे. या स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत अ ने बांग्लादेश अ टीमचा पराभव केला आहे. टीम इंडियाने ( Team India ) हा सामना 31 रन्सने जिंकला आहे.

रात गयी बात गयी…; टीम इंडियाचा पुढील दोन वर्षांचा कार्यक्रम जाहीर

टीम इंडियाकडून बांग्लादेशाला 128 रन्सचं आव्हान
अंतिम सामन्यामध्ये टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी डावाची सुरुवात कर्णधार श्वेता सेहरावत आणि उमा छेत्री या जोडीने केली. या जोडींने 28 रन्स केले. यानंतर कनिका आहुजाच्या 30 रन्स आणि वृंदा दिनेशच्या 36 रन्स जोरावर टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 127 रन्स केले. यावेळी बांग्लादेशाकडून सुलताना खातून आणि नाहिदा अख्तरने 2-2 विकेट घेतल्या.

ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी भिडणार टीम इंडिया अन् पाकिस्तान

श्रेयांका पाटील बांग्लादेशवर पडली भारी
फलंदाजी करण्यासाठी उतरलेली बांग्लादेशाच्या टीमला 100 रन्सदेखील करता आले नाही. टीम इंडियाच्या ( Team India ) गोलंदाजांनी अवघ्या 96 रन्समध्ये बांग्लादेशाच्या सर्व मुलींना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. या सामन्यात टीम इंडियाची गोलंदाज श्रेयांका पाटील विजयाची शिल्पकार ठरली. श्रेयांकाने 4 ओव्हर्समध्ये 13 रन्स देत 4 विकेट्स घेतल्या. तर मन्नत कश्यपने 3 आणि कनिका आहूजाने 2 विकेट्स घेत तिला उत्तम साथ दिली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!