ओव्हल : टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघांमधली जागतिक कसोटी (World Test Championship Finals) विजेतेपदाची फायनल आज पार पडणार आहे. हा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर (Oval Ground) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीने मोठा बदल केला असून दोन खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. ICC ने या सामन्यासाठी बॅकअप प्लॅन तयार केला आहे.
WTC Final 2023 : टीम इंडिया अन् ऑस्ट्रेलिया भिडणार; जाणून घ्या कोण ठरेल कोणावर भारी?
का तयार करण्यात आला बॅकअप प्लॅन ?
लंडनमध्ये सध्या जस्ट स्टॉप ऑइल आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात लोकांकडून ब्रिटन सरकारच्या तेल, गॅस आणि कोळसा योजनेचा विरोध करण्यात येत आहे. यामुळे आंदोलकांकडून खेळपट्टी खराब केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे काही झाल्यास दुसऱ्या खेळपट्टीवर सामना खेळवला जाईल. यावेळी आयसीसीने प्लेइंग कंडिशनबाबत नियम जारी केले आहेत. या नियमात दोन खेळपट्ट्यांबाबत कधी आणि कसा सामना खेळला जाऊ शकतो याबद्दल सांगण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊया या नियमांबाबत..
6.4.1 – जर मैदानी पंचांनी खेळपट्टी खेळण्यायोग्य नाही असं ठरवलं तर ते खेळ थांबवू शकतात आणि याबाबत आयसीसी मॅच रेफ्रींना कळवतील.
6.4.2 – ऑन फिल्ड पंच आणि आयसीसी मॅच रेफरी दोन्ही संघाच्या कर्णधारांशी याबाबत चर्चा करतील.
6.4.3 – जर कर्णधारांनी खेळ पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली तर सामना पुन्हा सुरू होऊ शकतो.
6.4.4 – जर खेळ त्या खेळपट्टीवर सुरू झाला नाही तर ऑन फिल्ड पंचांना मॅच रेफरींशी चर्चा करावी लागेल. खेळपट्टी दुरुस्त करता येऊ शकते का? असं केल्यास दोन्ही संघांना समान फायदा होईल का हे पाहिल्यानंतरच सामना खेळवला जाईल.
6.4.5 – खेळपट्टी दुरुस्त करता आली नाही तर रेफरी आयसीसीसोबत चर्चा करून खेळ दुसऱ्या खेळपट्टीवर खेळवण्याचा निर्णय घेतील. आयसीसी दुसऱ्या खेळपट्टीसाठी तयार असेल तरच सामना खेळला जाईल.
6.4.6 – दुसऱ्या खेळपट्टीवर राखीव दिवसासह निश्चित वेळेत सामना न झाल्यास सामना कोणत्याही निकालाशिवाय रद्द केला जाईल.
6.4.7 – या सर्व प्रक्रियेदरम्यान आयसीसी मॅच रेफरींना दोन्ही कर्णधार आणि हेड ऑफ द ग्राउंड यांच्याशी चर्चा करावी लागेल. यानंतर एकत्रित निर्णय घेतला जाईल.