Odisha Train

ओडिशा रेल्वे दुर्घटनेचे कारण आले समोर; रेल्वे मंत्र्यांनी दिली मोठी माहिती

565 0

बालासोर : ओडिशाच्या (Odisha) बालासोर इथे शुक्रवारी रेल्वेचा भीषण अपघात झाला. शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस (Shalimar-Chennai Central Coromandel Express) आणि बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस (Bangalore-Howrah Express) रुळावरून घसरल्याने आणि मालगाडीला धडकल्याने हा अपघात झाला होता. या भीषण अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला तर 900 हुन अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघातानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी रविवारी सकाळी बालासोर रेल्वे अपघातस्थळी पोहोचून सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बुधवारी सकाळपर्यंत सामान्य मार्ग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली.

तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी सांगितले की, अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल प्राप्त झाला आहे. एवढा भीषण अपघात कसा घडला याची माहितीदेखील समोर आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिग्नलमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला आहे. सिग्नलमुळे कोरोमंडल एक्सप्रेस एका बाजूच्या ट्रॅकमध्ये शिरली, ज्याला लूप लाइन म्हणतात. त्यावर काही मीटर पुढे एक मालगाडी उभी होती. वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍यांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, दोन गाड्या ज्या मार्गावर आदळल्या तो ट्रॅक मोठ्या प्रमाणात गंजलेला होता. त्यामुळे हा इतका भीषण अपघात झाला.

कसा घडला अपघात?
शुक्रवारी संध्याकाळी पहिली कोरोमंडल एक्सप्रेस गाडी आधीच उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. त्याचवेळी मागून येणाऱ्या बंगळुरू-हावडा एक्स्प्रेस गाडीने त्याला धडक दिली. या अपघाताचे वर्णन शतकातील सर्वात भीषण रेल्वे अपघात म्हणून केला जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!