Suicide

‘आपलं हे शेवटचं बोलणं’, म्हणत मित्राला शेवटचा कॉल करून तरुणाने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

332 0

छत्रपती संभाजीनगर : आजकाल तरुणांमध्ये आत्महत्यांचे (Suicide) प्रमाण खूप वाढले आहे. एखाद्या क्षुल्लक कारणावरून तरुणाई आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
नारायण अशोक पवार (Narayan Ashok Pawar) असे आत्महत्या केलेल्या 26 वर्षीय तरुणाचे नाव आहे. नारायण हा लिंबेजळगाव येथील एका खाजगी कंपनीत काम करीत होता. रोजच्या प्रमाणे शनिवारी दुपारी आपले काम संपवून तो स्वत:च्या दुचाकीवर कनकोरी गावाकडे निघाला होता. यादरम्यान त्याने आपला मोठा भाऊ योगेश व कंपनीतील सहकारी मित्रांना कॉल केला आणि सांगितले कि ‘आपले यानंतर कधीच बोलणे होणार नाही, हे शेवटचे संभाषण आहे’.

यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलत स्वत:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील कनकोरी या ठिकाणी घडली आहे. त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात (Shillegaon Police Station) नोंद करण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!