धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून अंबरनाथमध्ये पतीकडून पत्नीची हत्या

2694 0

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये पती – पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये लग्नाला 12 वर्ष होऊनही मूलबाळ होत नसल्याने पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. अंबरनाथच्या ऑर्डनन्स इस्टेटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
अंबरनाथच्या ऑर्डनन्स इस्टेटमधील एमपीएफ मैदानासमोर रोनीतराज मंडल (37) (Ronitraj Mandal) हा पत्नी नीतू कुमारी मंडल (30) (Neetu Kumari Mandal) सोबत वास्तव्याला होता. मूळच्या बिहारमधील असलेल्या या दोघांचं 2011 साली लग्न झालं होते. तर 2016 साली रोनीतराज हा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या अंबरनाथमधील मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत फिटर म्हणून कामाला लागला. ऑर्डनन्स इस्टेटमधील एच 38 या स्टाफ क्वार्टरमध्ये हे दाम्पत्य राहत होते. त्यांच्या लग्नाला 12 वर्ष झाली, तरी त्यांना मूलबाळ होत नसल्यानं नीतू कुमारीची आयव्हीएफ ट्रीटमेंटही (IVF Treatment) सुरू होती. मात्र, रोनीतराज हा या कारणावरून तिच्या चारित्र्यावर संशय घेत नेहमी आपल्या पत्नीशी वाद घालत होता.

घटनेच्या दिवशीदेखील रोनीतराज याचा जेवताना आपल्या पत्नीसोबत वाद झाला. यानंतर त्याने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात अवजड वस्तू मारून तिची हत्या (Murder) केली. यानंतर संध्याकाळच्या सुमारास त्याने शेजाऱ्यांना बोलावत आपल्या पत्नीची कुणीतरी हत्या केल्याचं सांगितलं आणि आपल्याला काहीच माहिती नसल्याचा बनाव रचला. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी तपास केला असता रोनीतराज याच्यावर संशय आला त्यांनी कसून चौकशी केली असताना आरोपीने आपला गुन्हा मान्य केला. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड (Assistant Commissioner of Police Motichand Rathod) यांनी दिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!