नागपूर : पुन्हा एकदा महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात काही नेत्यांमध्ये अंतर्गत वाद आहे. यामुळे महाराष्ट्र काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने पुन्हा एकदा दिल्लीत जाऊन याबाबतीत हायकमांडची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी हायकमांडकडे महाराष्ट्रात काँग्रेस (Maharashtra Congress) वाचवायची असेल तर नाना पटोले यांना पदावरुन हटवा अशी मागणी केली आहे.
कोणी भेटली भेट?
महाराष्ट्रातील काँग्रेसचे (Maharashtra Congress) ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवर (Vijay Vadettivar), सुनील केदार (Sunil Kedar), शिवाजीराव मोघे (Shivajirao Moghe) आणि संजय निरुपम (Sanjay Nirupam) या नेत्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेतली. मात्र सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट झाली नाही.
नाना पटोले यांच्यासंदर्भात हायकमांडकडे तक्रार करण्याची काँग्रेस (Congress High Command) नेत्यांची ही पहिलीच वेळ नाही. तर या आधीही महाराष्ट्रातील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेऊन त्यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा मागणी करण्यात आल्याने नाना पटोले यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.