पुणे : राज्यातील सत्तासंघर्षाचा उद्या (दि.11 मे) रोजी निकाल जाहीर होणार असून या निकलापूर्वीच घटनातज्ञ उल्हास बापट यांनी मोठं विधान केलं आहे. कायद्यानुसार आमदारांवर अपात्रतेची कारवाई विधानसभा अध्यक्षच करू शकतो. त्यामुळं सत्तासंघर्षाचं प्रकरण अध्यक्षांकडे सोपवले जाईल.
त्यांना निर्णय घेण्यासाठी वेळ दिली जाईल या प्रकरणात कायद्यानुसार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहू शकत नाही. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागेल. आणि उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील, असे उल्हास बापट म्हणाले आहेत.