#MAHARASHTRA POLITICS : “राज्यपालांच ‘हे’ कृत्य म्हणजे सरकार पाडण्यासाठी टाकलेलं पाऊल…!”; सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचा परखड सवाल, आज काय घडले ?

664 0

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. काल शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर आज राज्यपालांचे वकील तुषार मेहता यांचा युक्तिवाद झाला आहे. तुषार मेहता यांनी राज्यपालांचे अधिकार आणि त्यांनी घेतलेले निर्णय कसे योग्य होते, हे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.

मात्र, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी थेट राज्यपालांच्या कृतीवरच नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी बहुमत चाचणी घेतली. त्यांचं हे कृत्य म्हणजे सरकार पाडण्यासाठी टाकलेलं पाऊल होतं, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. सरन्यायाधीशांच्या या भूमिकेमुळे सध्या तरी ठाकरे गटाचं पारडं जड झालं असून शिंदे गटाची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!