महाराष्ट्र : अजून मार्च महिना सुरूही झाला नसला तरी तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. आता आगामी पाच दिवस वातावरणातील उष्णता आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात पुढील पाच दिवसात कमाल तापमान हे सामान्यपेक्षा तापमानापेक्षा तीन ते पाच अंशांनी जास्त असणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.मार्चच्या महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत वायव्य भारतातील काही ठिकाणी तापमानाचा पारा हा 40 अंश सेल्सिअस आणि त्याहून अधिक वाढू शकतो.