#CRIME NEWS : एकाच कुटुंबातील चौघांची हत्या की आत्महत्या ? त्याच कुटुंबातील तीन लहान मुले अद्याप बेपत्ता

1023 0

शिरूर : शिरूर चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत असलेल्या भीमा नदीच्या पात्रात 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर सलग 20, 21 आणि 22 जानेवारी रोजी देखील तीन मृतदेह आढळून आले. भीमा नदीपात्रामध्ये गेल्या पाच दिवसांमध्ये चार मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या मृतदेहाविषयी तपासामध्ये महत्त्वाची माहिती निष्पन्न झाली आहे.

अधिक वाचा : #CNG : तुम्ही CNG वाहन चालवता का ? मग ही बातमी वाचाच ! पुण्यातील सीएनजी पंप राहणार आहेत बेमुदत बंद

दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीतील सहा दिवसांपूर्वी ४ मृतदेह आढळून आले आहेत. या चारही मृतदेहांची ओळख पटली असून ते नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात राहणारे एकाच कुटुंबातील चार सदस्य आहेत. यामध्ये मोहन उत्तम पवार आणि संगीता मोहन पवार या दोघांची मुलगी राणी शाम फुलवरे आणि जावई श्याम फुलवरे या चौघांचा समावेश आहे.

धक्कादायक म्हणजे या कुटुंबातील आणखी तीन लहान मुले देखील बेपत्ता आहेत. या तीन लहान मुलांचा अद्याप देखील शोध लागला नसून प्रथमदर्शी ही आत्महत्या असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. याप्रकरणी आता दौंड पोलीस ही आत्महत्या आहे की घातपात यासह त्या तीन मुलांचा कसून शोध घेत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!