पुणे : महानगरपालिका निवडणुकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असून त्याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय.
राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबईसह राज्यातील 23 महानगरपालिकांचा कार्यकाळ संपला असून या सर्व महानगरपालिकांवर सध्या प्रशासकांची नेमणूक करण्यात आलीये. राज्यातील सत्तांतरानंतर तत्कालीन महाविकास आघाडीनं घेतलेला त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय बदलत शिंदे-फडणवीस सरकारनं 2017 च्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णया विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीये.