चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप करून महाराष्ट्र केसरीतील पंच मारुती सातव यांना धमकीचे फोन; कोथरूड पोलीस स्थानकात तक्रार दाखल

1306 0

पुणे : 10 ते 14 जानेवारी दरम्यान पुण्यात 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेनंतर एक मोठी बातमी समोर येते आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या कुस्तीवरून पंच मारुती सातव यांना संग्राम कांबळे या व्यक्तीकडून धमकी वजा फोन आल्याबाबत स्पर्धा नियोजन समितीचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांनी कोथरूड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.

सविस्तर माहिती नुसार, 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून मारुती सातव यांनी काम पाहिले. या कुस्तीमध्ये शेवटच्या खेळामध्ये महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यामध्ये लढत झाली होती . दरम्यान एका डावामध्ये महेंद्र गायकवाड यास 4.पॉईंट देण्यात आले. या विरुद्ध सिकंदर शेख च्या कोचने जुरी ऑफ अपीलकडे दाद मागितली होती. यावेळी जुरी ऑफ अपील असलेले दिनेश गुंड, नवनाथ ढमाळ आणि अंकुश नरवडे यांनी अपील केलेल्या डावाचा व्हिडिओ पाहून सिकंदर शेख यास एक पॉईंट आणि महेंद्र गायकवाड यास 4. P दिले होते. या स्पर्धेमध्ये पैलवान सिकंदर शेख याचा पराभव झाला.

त्यानंतर आज सकाळी स्पर्धेचे पंच असलेले मारुती सातव यांना फोन करून धमकी दिल्याची माहिती स्पर्धा समितीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली संग्राम कांबळे यांनी हे संभाषण सोशल मीडियावर प्रसारित करून स्वतःच्या रिवाल्वर मध्ये गोळ्या भरत असल्याचा व्हिडिओ प्रसारित केला असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. या कुस्तीचे जुरी असलेले दिनेश गुंड यांनी देखील हे संभाषण सोशल मीडियावर ऐकलं. याबाबत संग्राम कांबळे यांच्या विरुद्ध कोथरूड पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!