भाजपच्या ‘या’ दोन महत्त्वाच्या निर्णयामुळे शिंदे गटात नाराजी; ‘आम्हाला विचारात देखील घेतले नाही !’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मांडलं गाऱ्हाण

555 0

मुंबई : येत्या 30 जानेवारीला शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या पाच जागांसाठी निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी भाजपकडून तीन नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोकण शिक्षक मतदार संघासाठी ज्ञानेश्वर म्हात्रे, औरंगाबाद शिक्षक मतदार संघासाठी किरण पाटील आणि अमरावती पदवीधर मतदार संघासाठी माजी मंत्री रणजीत पाटील यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली आहे.

परंतु शिंदे गटाला ही उमेदवारी जाहीर करताना विचारात देखील घेतलं न गेल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जातो आहे. शिंदे गटाला विचारात न घेताच भाजपने विधान परिषदेचे उमेदवार जाहीर केल्याचे पडसाद मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देखील उमटले. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी देखील व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या देवेन भारती यांच्या नियुक्तीवरून देखील नाराज आहे.

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारणा केली. त्यात त्यांनी कोकण आणि नाशिकची जागा ही शिंदे गटासाठी ठरवलेली असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी असे परस्पर उमेदवार जाहीर करणे योग्य नसल्यास म्हटल आहे.

तर देवेन भारती यांची नियुक्ती विशेष पोलीस आयुक्त मुंबई पदी केल्याने पोलीस दलात नाराजी आहे. तसेच देवेन भारती यांची नियुक्ती ही देवेंद्र फडणवीस यांनी केली असून याबाबत माझ्याकडे बोट दाखवण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल आहे. त्यामुळे एकंदरीतच या दोन्हीही निर्णयामुळे शिंदे गटातील नेते भाजपवर नाराज असल्याचे दिसून येत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!