पुणे : आगामी नूतन वर्षाचे स्वागत करताना महाराष्ट्र अपघात मुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच मानसोपचार तज्ञ यांनी वाहतुकीच्या नियमा संदर्भात जनजागृती केली आहे.
घरातून निघताना घाई गडबडीत गाडी चालवणे, तसेच गाडी चालवताना हेल्मेट न घालणे, मोबाईलवर बोलणे, मोबाईलवर बोलत असताना लक्ष विचलित होऊन अवघ्या दोन ते तीन सेकंदात जीवही जाऊ शकतो अस या मोहिमेत मानसोपचार तज्ञांनी दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या वाहनधारकांना सांगितलं. जानेवारी ते ऑक्टोबर ह्या दहा महिन्यात महाराष्ट्रात साधारणत: 29 हजार अपघात झाले आहेत. त्यामध्ये 13000 लोक मृत्युमुखी पडले आहेत. फक्त पिंपरी चिंचवड शहरात वर्षात 867 अपघात झाले आहेत. त्यामध्ये 300 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे येणारे नवीन वर्ष हे अपघात मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात आला.