नागपूर : भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल यांनी महानगरपालिकेचे महापौर हे थेट जनतेमधून निवडावे आणि ही निवड पाच वर्षांसाठी असावी अशी शिफारस राज्य शासनाकडे केली आहे. याच शिफारिच्या पार्श्वभूमीवर उचित निर्णय घेण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात म्हटले आहे.
राज्यातील महानगरपालिकेचा महापौर पाच वर्षांसाठी जनतेमधून निवडून आवश्यक कार्यकारी अधिकार प्रदान करण्याबाबतचा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विचारला होता. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, त्याच्या अहवालातून 25 ऑगस्ट 2022 रोजी महापौर थेट जनतेतून निवड करावी आणि ही निवड पाच वर्षांसाठी करावी तसेच या महापौरांना आवश्यक ती कार्यकारी अधिकार रही प्रदान करण्यात यावेत, यासाठी कायद्यात सुधारणा करावी अशी शिफारस राज्य शासनाकडे केली आहे.
त्यांनी केलेल्या शिफारसीनुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचा मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.