कर्नाटकचे मंत्री मूर्ख ! आधी सीमा भाग केंद्रशासित होईल, संजय राऊतांचा चढला पारा, वाचा सविस्तर प्रकरण

236 0

मुंबई : कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एस अश्वत नारायण यांनी मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी केली आणि त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांनी कडाडून निषेध केला आहे. यावेळी संजय राऊत यांनी थेट मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री मूर्ख आहेत मुंबईत कानडी बांधवांवर अत्याचार होत नाहीत सीमा भागात मराठी बांधवांवर गेल्या 75 वर्षापासून अत्याचार होत आहे त्यामुळे आधी सीमा भाग केंद्रशासित होईल अशी कडाडून टीका केली आहे. 

अधिक वाचा : “मुंबई महाराष्ट्राची कोणाच्या बापाची नाही !” कर्नाटक मंत्र्याच्या ‘त्या’ संतापजनक वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले

संजय राऊत म्हणाले की मुंबईत कानडी बांधवांवर अत्याचार होत नाहीत मुंबईमध्ये संपूर्ण देश सामावलेला आहे फक्त कर्नाटक नाही मुंबईत मराठी माणसांसोबत उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल गुजरात अशा सगळ्याच प्रांतातील लोक गुण्यागोविंदाने राहतात आणि आम्ही त्यांना सन्मानाने वागवतो तसं सीमा भागात होतंय का नाही आधी सीमा भाग केंद्रशासित होईल कारण तिथे मराठी बांधवांवर गेल्या 75 वर्षापासून अत्याचार होत आहे म्हणून आम्ही ती मागणी करतोय मूर्ख आहेत ते मंत्री असे संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!