मुंबई : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल राज्यपाल टिंगल टवाळी करत आहेत. ही टिंगलटवाळी करताना राज्यपालांना शरम वाटली पाहिजे, असा घणाघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. तसेच राज्यपालांची हकालपट्टी केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा देखील शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
TOP NEWS MARATHI LIVE :महापुरुषांच्या अवमानाविरुद्ध मुंबईत महामोर्चा मविआच्या नेत्यांची भाषणं LIVE
आज महाविकास आघाडीच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलं असून या महामोर्चामध्ये बोलत असताना शरद पवार यांनी राज्यपालांवर सणकून टीका केली आहे.
TOP NEWS MARATHI LIVE : महापुरुषांच्या अवमानाविरुद्ध मविआचा महामोर्चा मुंबईतून UNCUT LIVE