महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : महाराष्ट्राचे तुकडे होत असताना इथलं षंढ आणि नामर्द सरकार गप्प बसले, तुमच्यात दम असेल तर…! संजय राऊत यांची तोफ पुन्हा धडाडली

378 0

मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद मोठ्या प्रमाणावर चिघळला आहे. सर्वच पक्षाचे नेते संताप व्यक्त करत आहेत. संजय राऊत यांनी देखील आज पत्रकार परिषद घेऊन कर्नाटक सरकार आणि शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी मला स्वतःला बेळगावमध्ये जावं लागेल अशी घोषणा केली होती. यावर आता आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक मध्ये जायला तयार आहोत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केला आहे.

बेळगावच्या लढ्यासाठी दिग्गजांनी आयुष्य वेचलं, आज महाराष्ट्राचे तुकडे होत असताना इथलं षंढ आणि नामर्द सरकार गप्प बसले ,तुमच्या दम असेल तर आधी दिल्लीला विचारा, हे चालणार नाही महाराष्ट्र पेटला तर त्यासाठी देशाचे गृहमंत्री जबाबदार असतील असं संजय राऊत म्हणाले आहेत.

यावेळी महाराष्ट्राचे असे तुकडे करण्यासाठी ठाकरे सरकार घालवलं का ? महाराष्ट्राच्या आर्थिक नाऱ्या सातत्याने आवळल्या जात असून कर्नाटक सरकार सोलापूर सांगली या महाराष्ट्राच्या जागेवर दावा सांगते दुसरीकडे मुंबईवर हल्ला सुरू आहे. एवढी हतबल परिस्थिती महाराष्ट्राने कधीही पाहिली नाही शिंदे सरकार डरपोक आहे. अशी कडाडून टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!