पुणे : गुरुवारी पुण्यातील पत्रकार भवन येथे एमपीएससीच्या MPSC विद्यार्थ्यांच्या समस्या आणि प्रश्न समजून घेणे आणि त्यांची भूमिका मंत्रालयात मांडण्याच्या दृष्टीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान या चर्चासत्रामध्ये विद्यार्थ्यांना उपस्थित राहता आले नाही. असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
पुण्यामध्ये आज अर्हम फाउंडेशनच्या वतीने वास्तव कट्टा या स्पर्धा परीक्षेच्या या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आल होता. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आपल्या समस्या आणि प्रश्न मांडण्यासाठी या वास्तव कट्ट्याचा आयोजन करण्यात आलं होतं. परंतु विद्यार्थ्यांना आत प्रवेशच मिळू शकला नाही. सर्व एमपीएससीचे विद्यार्थी हे सभागृहाच्या बाहेरच उभे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशेच वातावरण होतं. यावेळी विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त करताना आपल्या मागण्या देखील व्यक्त केले आहेत. विद्यार्थ्यांनी काय मागण्या केल्या आहेत पाहूया…