सोलापुर : सध्या सीमावाद हा महाराष्ट्राच सर्वात मोठा दुखणं आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रमध्ये दिसून येत आहेत. असं असताना सोलापुरातीलच आपल्या तब्बल 28 गावांनी कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक असून गावकऱ्यांनी कर्नाटकात जाण्याचा थेट निर्णय देखील घेतला आहे. धक्कादायक म्हणजे हा निर्णय घेतल्यानंतर गावामध्ये बोम्मई सरकारचा विजय असो…! कर्नाटकचा विजय असो…! अशा घोषणा देखील देण्यात आल्या त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भात फॅक्स देखील करण्यात आला असल्याचे समजते.
या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या सुमारे 30 गावांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बहिष्कार घातलेला असताना देखील राज्यकर्त्यांनी साधी त्याची दखल देखील घेतली नाही. तसेच मुख्यमंत्री पदी सुशीलकुमार शिंदे विराजमान झाले, सुशील कुमार शिंदे यांच्या मतदारसंघात असून देखील गावांचा कोणताही विकास झाला नाही. या गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी प्रश्न त्यासह आरोग्याचा देखील मोठा प्रश्न अगदी स्वातंत्र्यापासून जैसे तेच आहे. त्यामुळे गरोदर महिलांपासून ते अत्यावश्य रुग्णांना कित्येक वेळा आपली जीव गमवावे लागले असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळेच थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना संपर्क करून ही गावे कर्नाटकमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे कळविण्यात आले. यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी देखील कर्नाटकात ते सामील झाल्यानंतर सर्व सुविधा मिळतील याचे आश्वासन दिले असल्याचे समजते.
त्यामुळे राज्य सरकार समोर आता बिकट समस्या उभी राहिली आहे. यावर आता राज्य सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.