“राहुल गांधी को मैने बोहोत सालो पहले छोड़ दिया है…!”; असे का म्हणाले राहुल गांधी, वाचा सविस्तर

274 0

मध्य प्रदेश : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने महाराष्ट्रात वादंग उभे राहिले होते. सध्या राहुल गांधी यांची हि यात्रा मध्यप्रदेशमध्ये आहे. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. या यात्रेच्या माध्यमातून तुम्ही काय शिकले ? असा प्रश्न एका पत्रकाराने राहुल गांधी यांनी विचारला असता, राहुल गांधी को मैने बोहोत सालो पहले छोड़ दिया है असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले आहे.

अर्थात मी राहुल गांधी यास केव्हाच मागे सोडून दिले आहे असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. तथापि राहुल गांधी यांचे हे उत्तर अस्पष्ट पण तितकेच थेट होते. अनुभवातून शहाणपण येते असेच प्रगल्भतेने त्यांनी दिलेल्या या उत्तरावर अनेक नेटकऱ्यांनी देखील सकारात्मक प्रातिक्रिया दिल्या आहेत. एकाने भावी PM अशी देखील कंम्मेण्ट केली आहे. तर एकाने ‘बाकी सगळं सोडा, राहुल गांधीच्या डोळ्यातील कॉन्फिडन्स बघा’ आहि प्रतिक्रिया दिली आहे.

“भारत जोडो यात्रा ही माझ्यासाठी तपस्या आहे. मला या यात्रेकडून काहीही अपेक्षा नाहीयेत. मला वाटलं की धार्मिक तेढामुळे लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालंय. ही भिती घालवण्यासाठी मी रस्त्यावर उतरलोय. लोकांना पुन्हा एकदा प्रेम करायला शिकवायला मी रस्त्यावर आलोयवाशी प्रतिक्रिया यावेळी राहुल गांधी यांनी यावेळी दिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!