पुणे : पुण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेनं शहरातील पाच महत्त्वाच्या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणीपुरवठा बंदचा मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
पुणे शहरातील बाणेर, बालेवाडी, पाषाण, कोथरूड आणि शिवाजीनगर या भागांमध्ये पुढील दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यानुसार, मंगळवारपासून गुरुवारपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. शहरातील जलशुद्धीकरण केंद्रांवरील विद्युत दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येत असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पुण्यात महापालिकेनं शहरातील बहुतांश भागांमध्ये पाणीपुरवठा बंद केल्याने नागरिकांना कमीत कमी पाण्यात दैनंदिन गरजा भागवाव्या लागणार आहेत. याशिवाय उपलब्ध असलेलं पाणी जपून वापरण्याचं आवाहन शहरवासियांना करण्यात आलंय. पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांमध्ये एकाचवेळी दोन दिवसांची पाणीबाणी जारी करण्यात आल्याने नागरिकांना पुढील 48 तास पाणी जपून वापरावे लागणार आहे.