महाराष्ट्र : लवकरच महाराष्ट्रामध्ये 14,956 पोलीस भरती होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळामध्ये ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी फॉर्म भरले होते, परंतु आता त्यांची वयोमर्यादा समाप्त झाली आहे. अशा उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकारने पोलीस भरती मधील वयोमर्यादेचा तांत्रिक अडथळा दूर केला आहे.
ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी फॉर्म भरला होता त्या सर्व उमेदवारांना पोलीस भरतीची संधी उपलब्ध होणार आहे. अर्थात त्या सर्व उमेदवारांसाठी वयोमर्यादा समाप्त झाली होती ,त्यामुळे ते परीक्षेला बसण्यासाठी पात्र नव्हते. मात्र आता त्या उमेदवारांच्या वयोमर्यादेत शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता पोलीस भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्रामध्ये मुंबई 6740, ठाणे शहर ५२१, पुणे शहर 720, पिंपरी चिंचवड 216, मीरा-भाईंदर 986, नागपूर शहर 308, नवी मुंबई 204, अमरावती शहर 20, सोलापूर शहर 98, लोहमार्ग मुंबई 620, ठाणे ग्रामीण 68, रायगड 272, पालघर 211, सिंधुदुर्ग 99, रत्नागिरी 131, नाशिक ग्रामीण 454, अहमदनगर 139, धुळे 42, कोल्हापूर 24, पुणे ग्रामीण 579, सातारा 145, सोलापूर ग्रामीण 26, औरंगाबाद ग्रामीण 39, नांदेड 155, परभणी 75, हिंगोली 21, नागपूर ग्रामीण 132, भंडारा 61, चंद्रपूर 194, वर्धा 90, गडचिरोली 348, गोंदिया 172, अमरावती ग्रामीण 156, अकोला 327, बुलढाणा 51, यवतमाळ 244, लोहमार्ग पुणे 124, लोहमार्ग औरंगाबाद 154, अशा एकूण 14,956 जागा लवकरच भरल्या जाणार आहेत.
यामध्ये अनुसूचित जाती 1811, अनुसूचित जमाती 1350, विमुक्त जाती अ 426, भटक्या जमाती ब 374, भटक्या जमाती क 473, भटक्या जमाती ड 292 ,विमुक्त मागासवर्ग 292, इतर मागासवर्ग 2926, ईडब्ल्यूएस 1544 आणि खुल्या प्रवर्गासाठी 5468 जागा अशा एकूण 1495 जागा आहेत.