मुंबई : भाजपने आता मुंबई महापालिकेकडे मोर्चा वळवला आहे. एकहाती सत्ता मिळवण्याच्या उद्देशाने “आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्यासाठी शेवटची निवडणूक आहे असे समजून लढा” अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी हर हर महादेव म्हटले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ‘मंत्री तुमच्या दारी’ हा उपक्रम सुरू करणार आहे. त्यामुळे थेट जनतेमध्ये जाऊन मंत्री आता संवाद साधणार आहेत. मुंबईकरांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या हेतूने भाजपचा हा नवा फंडा आहे.
तर पालकमंत्री पद मिळाल्यानंतर मंगल प्रभात लोढा हे देखील ॲक्शन मोडमध्ये आले असल्याचे पाहायला मिळते. त्यांनी ‘पालक मंत्री तुमच्या दारी’ हा उपक्रम सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान मुंबई आणि उपनगरामध्ये वॉर्डनिहाय जनता दरबार घेण्यात येणार असल्याच देखील समजते आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून हा जनता दरबार सुरू होणार आहे.