MAHARASHTRA POLITICS : बारामती दौऱ्यावर असलेल्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी येथील मुक्ताई लॉनमध्ये भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण विभागाचा संघटनात्मक आढावा त्यांनी घेतला.बारामती लोकसभा क्षेत्राची जबाबदारी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना दिली आहे. त्याचा दौरा या महिन्यात होणार आहे. खुद्द पंतप्रधान मोदी बारामतीला येणार असून ते सभा घेणार असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. नागपूर एवढेच लक्ष बारामतीवर राहणार असल्याचे बावनकुळे यावेळी म्हणाले.
बारामती मतदारसंघातून मागील 40 वर्षांपासून सत्ता चालविली जातेय. त्याचसाठी जनतेने मते दिली आहेत. हे मतांचे कर्ज असल्याने बारामतीचा विकास झालाय. हे बारामतीवर उपकार नाहीत अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी वचनबद्ध व्हावे असे आवाहनही केले.
तसेच “आमचं मिशन मुंबई अथवा मिशन बारामतीही नाही ,आम्ही पूर्ण ताकतीने एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप युती करूनच लढणार आहोत. मला विश्वास आहे की, महाराष्ट्र पुन्हा ती चूक करणार नाही. या आधी आमच्यावर राज्याने विश्वास दाखवला. इथून पुढेही दाखवतील. मधल्या काळात दगाफटका झाला तोही राज्याने पाहिला पण आता तसं होणार नाही. कारण शिंदे आणि फडणवीस हे वरवर एकत्र नाही तर अंतर्मनाने जोडले आहेत. ” असे बावनकुळे यावेळी म्हणाले.
बावन कुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखा वरची धूळ पण उडणार नाही
उद्गारली अनेक कुळे केवळ साहेबां मुळे— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 7, 2022
यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की , “बावनकुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायाच्या नखावरची धूळपण उडणार नाही. अनेक कुळे केवळ साहेबांमुळे…! असे ट्विट त्यांनी केले आहे.
बारामतीचा गड जिंकून दे असं साकडं बारामतीच्या मारूतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातलं. 60 वर्षे प्रत्येक निवडणूकीचा फॉर्म आदरणीय शरद पवार साहेब ह्याच मारूतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते ?
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 7, 2022
यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर केलं आहे. बावनकुळे म्हणाले की, “जितेंद्र आव्हाडांना जे बोलायचं आहे ते बोलू द्या. 2024 ला बघू… निवडणुका होतील, त्यावेळेस कुणाच्या पायाखालची वाळू सरकते… कोण उध्वस्त होतंय.. हे कळेलच की, शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नाला बारामतीकर साथ देतील असे देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.