Hair Care : पावसाळा म्हंटल की सुरुवातीचे दिवस वातावरणातील थंडाव्याने आणि पहिल्या पावसात भिजल्याने खूप छान वाटतात. पण ऋतू बरोबर येणारे आजारपण , शरीरात होणारे बदल आणि त्यामुळे चेहऱ्यात आणि केसावर होणारे परिणाम हे देखील प्रकर्षाने त्रासदायक ठरतात. पावसाळ्यामध्ये अनेक महिला केस खूप गळतात … अशी तक्रार करत असतात . खरंतर या ऋतुमानामध्ये केस गळती पूर्णपणे थांबवणं किंवा कोणत्याही ऋतुमानात केस पूर्णपणे गळणे थांबवणे हे शक्यच नाही. ती देखील एक नैसर्गिक प्रक्रियाच आहे . पावसाळ्यात देखील केस गळणे ही एक नैसर्गिक प्रक्रियाच असली तरी केस गळतीचे प्रमाण सामान्य पेक्षा अधिक वाढते . मग अशावेळी काही उपाय केल्याने हे प्रमाण कमी होऊ शकते…
- पावसात भिजल्यानंतर केस शाम्पू ने स्वच्छ धुणे टाळू नका.
- अति गरम पाण्याने केस धुणे नेहमीच टाळणे आवश्यक आहे.
- योग्य तेल ,शाम्पू ,कंडिशनर आणि सिरम यांचा वापर होणे गरजेचे आहे. जर केस गळती ही नेहमीच जास्त असेल तर योग्य वैद्यकीय
- सल्ला घेऊन केसांच्या आरोग्याकडे या चार स्टेप्स अवश्य फॉलो करा.
- केस धुतल्यानंतर कोरडे करण्यासाठी ड्रायरचा वापर करणे , किमान पावसाळ्यात टाळावे. सुती कपड्याने केस हलके बांधून ठेवावे . त्यानंतर देखील ओले केस बांधणे टाळून केस पूर्णपणे वाळेपर्यंत मोकळे सोडा.
- केस ओले असताना विंचरणे नेहमी टाळा.
- आठवड्यातून किमान दोन वेळा कोमट तेलाने केसाच्या मुळाशी हलका गोलाकार मसाज करा.
- केस अति घट्ट बांधणे किंवा नेहमीच मोकळे सोडणे थांबवा. केस मोकळे सोडणे आवडत असेल तर सणसमारंभाला बाहेर फिरायला
- जाताना ठराविक वेळीच मोकळे सोडा . इतर वेळी हलकी वेणी घालून केस बांधून ठेवावेत.
- तीन महिन्यातून एकदा केसाना केमिकल विरहित मेहंदी लावावी त्याने चांगले कंडीशनिंग होते.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे केस अति गळत असतील तर , दोन लाल कांदे चिरून घ्यावेत . त्यानंतर ते मिक्सर मधून बारीक करून घ्या . या
- चौथ्याचा चांगला रस पिळून काढून घ्यावा. कांद्याचा हा रस केसांच्या मुळाशी लावा . केस धुण्याच्या 20 ते 25 मिनिट आधी कांद्याचा
- ज्यूस केसाच्या मुळाशी लावावा . याने केस गळती लवकर थांबेल.