पुणे : मंगळवारी रात्री पुण्यामध्ये कात्रज परिसरात शिंदे गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला करण्यात आला होता . या हल्ल्यानंतर याप्रकरणी सहा जणांना अटक देखील करण्यात आली आहे .यामध्ये संभाजी थोरवे ,सुरज लोखंडे ,संजय मोरे आणि बबन थोरात आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली .
दरम्यान याप्रकरणी शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी दिली आहे . या हल्ल्याप्रकरणी सुभाष देसाई म्हणाले आहेत की ,” ही तर कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे”…! शिवसेना आता बंडखोरांबाबत अधिक आक्रमक झाल्याचे हे या हल्ल्यातून स्पष्ट दिसून येते आहे.
दरम्यान या हल्ल्याप्रकरणी गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. राज्यात अशा प्रकारचे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत , कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल आहे.