Uddhav Thackrey : “घी देखा लेकिन कोल्हापुरी जोडा नही देखा ; राज्यपालांना कोल्हापुरी जोडे सुद्धा दाखवण्याची वेळ आली आहे”…! (Video)

278 0

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र भर तीव्र पडसाद पडत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील कोश्यारी यांच्यावर रोखठोक टीका केली आहे.

“राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठी माणसाचं मीठ खाल्लं आहे. मराठी माणसाचं प्रेम त्यांनी पाहिलं ,पण मराठी माणसात फूट का पाडतात ? राज्यपालांना आता घरी पाठवायची वेळ आली आहे . किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तुरुंगातही पाठवायची वेळ आली आहे .अशी थेट प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे एका सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बोलत असताना “मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांचा पैसा काढून घेतला तर ही आर्थिक राजधानीच राहणार नाही”…! असे वक्तव्य केले होते . त्यांच्या याच वक्तव्यावरून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

तसेच “राज्यपाल म्हणून त्या खुर्चीचा मान राज्यपालांनी ठेवायला पाहिजे . पण त्या खुर्चीत बसवलेल्या कोश्यारीने खुर्चीचा मान ठेवला नाही .गेल्या तीन वर्षातील त्यांची विधाने असतील, काही त्यांचे कॅमेऱ्याने टिपलेले दृश्य असतील. ते पाहिल्यावर महाराष्ट्राच्या नशिबी अशी माणसे का येतात ? हा प्रश्न पडला आहे .”

मी मुख्यमंत्री असताना लॉक डाऊनच्या काळात लोकांचे प्राण जात होते .तेव्हा त्यांना सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे उघडण्याची घाई झाली होती. मी तो विषय वाढवला नाही . त्यांनी पत्र दिलं त्यावर मी उत्तर दिलं होतं . मी मुख्यमंत्री म्हणून तेव्हा जबाबदारी पार पाडली ,तसेच सावित्रीबाई फुले बद्दल हिणकस उद्गार देखील त्यांनी काढले .महाराष्ट्रात राहत आहेत ,महाराष्ट्रात राहून सर्व काही ओरपले आहे . पंगत-मान मरातब घेतला आणि महाराष्ट्रातच मराठी माणसाचा अपमान केला ?असा संताप देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!