एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्रीमंडळात झालेले महत्त्वाचे निर्णय सांगितले. यावेळी सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार ,असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिली. या निर्णयाला विरोधी पक्षाने विरोध करून अनेक टीकाटिप्पणी केली. विरोधकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत टीका केली आहे.
सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून झाली तर हा लोकशाहीचा अपमान आहे. यामागे ही भाजपने हा निर्णय घेतला होता तेव्हा सरपंच आणि नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि खाली अन्य पक्षांचे बहुमत होते. यामुळे विकासकामे होत नाही, अनेक प्रश्नांवर निर्णय होत नाही, असा दावा अजित पवारांनी केला होता आणि सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयाला विरोध केला होता. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे भक्कम सरकार पाडण्याचं काम भाजपने केलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी वेषांतर करून सगळ्या घडामोडी घडवल्याचा आरोप त्यांनी केला.
अजित पवार यांच्या सरपंच आणि नगराध्यक्षांच्या निवडणुकीच्या भूमिकेबाबत उपमुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया मांडळी आणि अजित पवारांवर टीका केली. सरपंच नगराध्यक्षांच्या थेट निवडी झाल्यास पराभावाची भीती अजित पवारांना वाटत असेल अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.