वंदे भारत एक्स्प्रेसनं प्रवास करताय? मग जाणून घ्या ही खास माहिती

673 0

‘मुंबई ते सोलापूर’ आणि ‘मुंबई ते शिर्डी’ अशा दोन वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. वंदे भारत एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना जोडण्याचं काम होणार आहे. या ट्रेनची खासियत काय आहे पाहूयात

दोन ट्रेन एकाच दिवशी सुरू होणं हे भारतात कधीही कुठेही झालं नाही. ते मुंबईमध्ये झालं आहे. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर, शिर्डी दर्शन तसच सोलापूर येथे सिद्धेश्वर पंढरपूर या धार्मिक स्थळांना जोडण्याचं काम ही ट्रेन करत आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक अर्ध द्रुतगती रेल्वे सेवा आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची ही रेल्वेगाडी चेन्नई येथील इंटिग्रल कोच कारखान्यामध्ये उत्पादित करण्यात आली. भारत सरकारच्या मेक इन इंडिया अंतर्गत 18 महिन्यांच्या कालावधीत 100 कोटी रुपये खर्चून या रेल्वेगाडीची संकल्पना, विकास, निर्मिती केली गेली.
15 फेब्रुवारी 2019 रोजी पहिली वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली.

नवीन पिढीतील वंदे भारत एक्सप्रेस तंत्रज्ञानाने सुसज्ज असून या ट्रेनमध्ये टक्कर टाळणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. या नव्या यंत्रणेच्या मदतीने अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे. या ट्रेनमध्ये काय सुविधा आहेत पाहूयात

वंदे भारत एक्सप्रेस वेग, सुरक्षितता आणि सेवेसाठी खास आहे. ट्रेनचा वेग 160 किमी प्रतितास पेक्षा जास्त आहे. यात शताब्दी गाड्यांसारखे प्रवासी डबे आहेत. जे प्रवाशांना चांगली सेवा देतात. सहा तासात ही ट्रेन आपलं अंतर पार करणार आहे. या ट्रेनला 16 डब्बे आहेत तर सर्व मिळून 1188 सीट्स आहेत.
या ट्रेनच्या सर्व डब्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे, जीपीएस (GPS) आधारित ऑडिओ-व्हिज्युअल पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम, मनोरंजनासाठी ऑनबोर्ड हॉटस्पॉट वाय-फाय आणि अतिशय आरामदायक आसनव्यवस्था आहे. एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये फिरत्या खुर्च्या आणि बायो-व्हॅक्युम टॉयलेटही आहेत.
त्याचप्रमाणे दृष्टिहीन प्रवाशांच्या सोयीसाठी, अशा प्रवाशांना त्यांच्या आसनांपर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी आसनांवर ब्रेल लिपी क्रमांक कोरण्यात आला आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ही सकाळची ट्रेन असल्यानं नाश्तामध्ये बेसन पोळी, ज्वारीची भाकरी, चिवडा, शेंगदाणा हे पदार्थ दिले जाणार आहेत. जेवणाच्या वेळी शाकाहारी प्रवाशांना झुणका नाचणीची भाकरी, शेंगदाणा पुलाव, मटार शेंगदाणा पुलाव तर मांसाहारी प्रवाशांना चिकन कोल्हापुरी, तांबडा पांढरा रस्सा हे पदार्थ दिले जाणार आहेत

वंदे भारत एक्सप्रेसने मुंबई ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी साडे पाच तास लागणार आहेत तर मुंबई ते सोलापूर हे अंतर पार करण्यासाठी 6 तास लागणार आहेत. या ट्रेनचे तिकीट दर काय आहेत पाहूयात

मुंबई ते पुणे
चेअर कार – 560 रुपये
एक्झिक्युटिव्ह क्लास – 1135 रुपये

मुंबई ते नाशिक
चेअर कार – 550 रुपये
एक्झिक्युटिव्ह क्लास – 1150 रुपये

मुंबई ते शिर्डी
चेअर कार – 800 रुपये
एक्झिक्युटिव्ह क्लास – 1630 रुपये

मुंबई ते सोलापूर
चेअर कार – 965 रुपये
एक्झिक्युटिव्ह क्लास – 1970 रुपये

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!