भारताचा पाकिस्तानला धक्का; पहलगामा हल्ल्यानंतर भारताने घेतले हे मोठे निर्णय

4046 0

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम शहरात दहशतवादी हल्ला झाला असून टीआरएफ या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा समावेश आहे.

या हल्ल्यानंतर भारताने आता पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला असून आज झालेल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्याबाबतचे अधिकृत माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

भारताकडून सिंधू जल कराराला स्थगिती देण्यात आली असून या सोबतच पुढील 48 तासात भारतात वास्तव्यास असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा अशा सूचनाही देण्यात आल्यात. यासोबतच पाकिस्तानी नागरिकांना भारताचा व्हिसा आता मिळणार नाही. या सोबतच अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय.

Share This News
error: Content is protected !!