येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिलं जाईल; कार्यालय तोडफोडीनंतर तानाजी सावंत यांची पहिली प्रतिक्रिया

386 0

गुवाहाटी- राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असून शिवसेनेचे 41 आमदारांसह ते गुवाहाटी दाखल झाले आहेत. या सर्व राज्यात उमटू लागले आहेत. पुण्यात आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या तोडफोडीनंतर फेसबुक पोस्ट करत तानाजी सावंत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सावंत हे शिंदे गटात सामील झाल्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. या तोडफोडीनंतर फेसबुक पोस्ट करत तानाजी सावंत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले आमचे गटनेते मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत. एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला आहे.

त्याच बरोबर प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं असा इशारा देखील त्यांनी दिला. दरम्यान आता यामुळे महाविकास आघाडी आणि शिंदे गट यांच्यामधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्यांमध्ये राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे यांच्यासह शिवसेना पाठिंबा देत राज्यमंत्री झालेल्या बच्चू कडू अशा मोठ्या नावांचा समावेश आहे. राज्याचे माजी जलसंधारण मंत्री आणि भूम-परांडाचे आमदार तानाजी सावंत देखील शिंदे गटात सामील झाले आहेत.

तानाजी सावंत यांची फेसबुक पोस्ट पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02Jyvbfie4B6cN6za31mroNZQB2hzg5jAw9GQa5ng98uW1Azi7CrHPTF4AqxQ99J7Vl&id=100044334042383&sfnsn=wiwspwa

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!