दहावीच्या परीक्षेत शिक्षकच विद्यार्थ्यांना पुरवतोय कॉप्या, पैठण तालुक्यातील प्रकार (व्हिडिओ)

198 0

औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी शाळेने मोठा मांडव टाकून त्यामध्ये विद्यार्थ्यांना बसण्याची सोय केली. एवढेच नाही तर मुलांना चक्क गाईडद्वारे कॉप्याही पुरवल्या. शिक्षण विभागाने शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून यामध्ये शाळेतील शिक्षकच दहावीच्या विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवत असल्याचे दिसून येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील निलजगाव इथल्या लक्ष्मीबाई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी शाळेने चक्क लग्न समारंभात टाकतात, तो मंडप टाकून व्यवस्था केली. या मंडपातच मुलांना परीक्षेला बसवलं. त्याच शाळेत दहावीचीही परीक्षा घेतली आणि त्यात तर मुलांना चक्क गाईडद्वारे कॉप्याही पुरवल्या.

या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये बालभारतीचं गाईड घेऊन एक शिक्षक पळताना दिसतोय. एकूणच या प्रकाराची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून या शाळेची मान्यता रद्द केल्याचे आदेश जारी केले आहेत.

Share This News

Related Post

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी

Posted by - May 3, 2022 0
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या कंपनीमध्ये विविध जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.…

UDAY SAMANT : मग गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही ? नाणार रिफायनरीची 3.5 लाख कोटींची गुंतवणूक तरी गांभीर्याने घ्या !

Posted by - September 13, 2022 0
मुंबई : फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल कंठशोष करताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देण्यात कमी का पडलो,…

सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला; आज न्यायालयात काय घडले ? वाचा सविस्तर

Posted by - January 10, 2023 0
नवी दिल्ली : शिवसेनेतील मोठ्या बंडखोरीनंतर सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षाचे प्रकरण अद्याप देखील प्रलंबित आहे. या प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी…

विवाहानंतर पॅनकार्डमध्ये नवीन नाव आणि पत्ता अपडेट करणे गरजेचे; अन्यथा…

Posted by - October 29, 2022 0
विवाहानंतर मुलीचे घर बदलते आणि आडनावही. अर्थात आडनाव बदलणे आवश्यक नाही, परंतु विवाहानंतर आडनावात बदल होत असेल तर पॅनकार्डमध्ये अपडेट…

सावधान : कोरोनानंतर आता H3N2 ने घेतला दोघांचा बळी; केंद्र सरकार अलर्ट मोडवर

Posted by - March 11, 2023 0
भारत : दोन वर्ष कोरोना ने जगभरात थैमान घातल्यानंतर आता H3N2 या विषाणून आपलं जाळं पसरवायला सुरुवात केली. त्यामुळे सावध…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *