महाराष्ट्रात तब्बल “इतके” पाकिस्तानी नागरिक; सर्वाधिक पाकिस्तानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात

2173 0

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात 27 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्यामुळे भारताचे नागरिक भारतामध्येही सुरक्षित नसल्याची भावना निर्माण झाली. तर दुसरीकडे याच भारतात पाकिस्तानी नागरिक अगदी सुरक्षित वातावरणात राहत असल्याचा समोर आलय. त्यातच महाराष्ट्रात किती पाकिस्तानी वास्तव्यास आहेत याचा आकडा पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात कोणत्याही कारणाने वास्तव्यास असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत देश सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या संदर्भातले निर्देश प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून देण्यात आले होते. मुदत संपल्यानंतर भारतात एकही पाकिस्तानी राहणार नाही याची खात्री राज्यांनी घ्यायची आहे. त्यामुळेच आपापल्या राज्यात जेवढे पाकिस्तानी नागरिक असतील त्यांना शोधून तात्काळ पाकिस्तानात परत पाठवण्याचं काम राज्य सरकारने हाती घेतलं आहे. त्याचा अनुषंगाने कोणत्या राज्यात किती पाकिस्तानी नागरिक आहेत याची आकडेवारी जारी केली जात आहे. त्यानुसार महाराष्ट्रात तब्बल 5023 पाकिस्तानी असल्याचं उघड झालं आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी? 

1. अकोला (AKOLA) – 22
2. अहिल्यानगर (AHILYANAGAR) 14
3. अमरावती (AMRAVATI C)- 117
4. अमरावती (AMRAVATI R)- 1
5. छत्रपती संभाजीनगर (AURANGABAD C)- 58
6. छत्रपती संभाजीनगर (AURANGABAD R) – 1
7. भंडारा (BHANDARA 0)
8. बीड (BEED)- 0
9. बुलढाणा (BULDHANA)- 7
10. चंद्रपूर ( CHANDRAPUR)- 0
11. धुळे (DHULE) 6
12. धारशिव (DHARASHIV)- 0
13. गडचिरोली (GADCHIROLI)- 0
14. गोंदिया (GONDIA)- 5
15. हिंगोली (HINGOLI)- 0
16. जळगाव (JALGAON)- 393
17. जालना (JALNA)- 5
18. कोल्हापूर (KOLHAPUR) – 58
19. लातूर (LATUR) – 8
20. मुंबई (MBVV)- 28
21. नाशिक (NASHIK C)- 8
22. नाशिक (NASHIK R)- 2
23. नागपूर (NAGPUR C)- 2458
24. नागपूर (NAGPUR R)- 0
25. नांदेड (NANDED) 4
26. नंदुरबार (NANDURBAR)- 10
27. नवी मुंबई (NAVI MUMBAI)- 239
28. परभणी (PARBHANI) 3
29. पालघर (PALGHAR) – 1
30. पिंपरी चिंचवड (PIMPRICHINCHWAD) -290
31. पुणे (PUNE) – 114
32. पुणे (PUNE R) -0
33. रायगड (RAIGAD)- 17
34. रत्नागिरी (RATNAGIRI) 4
35. सातारा (SATARA)- 1
36. सांगली (SANGLI)- 6
37. सोलापूर (SOLAPUR C) – 17
38. सोलापूर (SOLAPUR R) 0
39. सिंधुदुर्ग (SINDHUDURG) 0
40. ठाणे (THANE C) 1106
41. ठाणे (THANE R) 0
42. वर्धा (WARDHA) 0
43. वाशिम (WASHIM) 6
44. यवतमाळ (YAVATMAL) 14

एकूण -5023

ही महाराष्ट्रातील कागदोपत्री वैधरित्या राहणाऱ्या नागरिकांचे संख्या आहे. मात्र अवैध बेकायदेशीर पद्धतीने वास्तव्य करणारे ही अनेक नागरिक असू शकतात. त्यामुळे त्यांचाही शोध घेणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक नागरिक हे मुख्यमंत्र्यांच्या शहरात अर्थात नागपूरमध्ये आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये आहेत. त्यामुळेच या सर्व नागरिकांना लवकरात लवकर भारतातून पाकिस्तानात पाठवण्याची जबाबदारी ही राज्य सरकार आणि प्रशासनावर आहे.

Share This News
error: Content is protected !!