महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(AJIT PAWAR) यांचे बारामती (BARAMATI) येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झाले आहे. या दुर्दैवी घटनेत विमानातील एकूण सहा जणांचा अंत झाला असून, संपूर्ण राज्य या घटनेने हादरून गेले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार(AJIT PAWAR) हे आज सकाळी मुंबईहून(MUMBAI)एका महत्त्वाच्या सभेसाठी बारामतीच्या(BARAMATI) दिशेने रवाना झाले होते. त्यांचे छोटे विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याच्या (Landing) तयारीत असतानाच ही भीषण दुर्घटना घडली.
लँडिंग दरम्यान विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते जमिनीवर कोसळले. कोसळल्यानंतर काही क्षणातच विमानाने पेट घेतला. या आगीच्या भक्ष्यस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह(AJIT PAWAR) विमानातील इतर ५ प्रवासी आणि क्रू मेंबर्स पडले. सर्वांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या अपघाताच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला असून, तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
अजित पवार(AJIT PAWAR) म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ‘धडाडीचे नेतृत्व’. प्रशासनावरील पकड आणि विकासकामांचा धडाका यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. बारामती या त्यांच्या बालेकिल्ल्यात निवडणुकीच्या तोंडावरच ही दुर्घटना घडल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे.