महाराष्ट्र कृषी दिवस का साजरा केला जातो आणि त्याचे महत्व काय आहे जाणून घ्या….

299 0

भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो .बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह हा ‘शेती ‘वरती अवलंबून आहे .महाराष्ट्रात तर शेती हा व्यवसाय प्रामुख्याने केला जातो. आपल्या राज्याची व देशाची कार्यव्यवस्था ही कृषीवरती अवलंबून आहे.1 जुलै हा दिवस सगळीकडे कृषी दिन म्हणून साजरा केला जातो

  • महाराष्ट्र कृषी दिवस का साजरा केला जातो जाणून घ्या इतिहास आणि महत्व

1 जुलै हा दिवस महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त साजरा केला जातो .महाराष्ट्रात कृषी हा व्यवसाय प्रामुख्याने केला जातो .सगळ्यात जास्त उत्पादक हे महाराष्ट्रात होते .दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई ,दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या यांसारख्या गंभीर समस्येवर आजच्या दिवशी म्हणजे 1 जुलैला उपाय काढण्यासाठी आजच्या दिवशी प्रामुख्याने लक्ष दिले जाते .आजच्या दिवशी शेतकऱ्यांच्या कामाला विशेष प्राधान्य दिले जाते तसेच वेगवेगळ्या कार्यक्रंमांचे आयोजन करून त्यांचा गौरव केला जातो .

वसंतराव नाईक हे 1963 ते 1975 या कालावधीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते . या कालावधीत त्यांनी शेतीसाठी कृषी क्षेत्राला विशेष चालना मिळण्यासाठी प्रयत्न केले तसेच राज्यातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी कार्यरत राहिले .त्यांचा जन्म 1 जुलै ,1913 रोजी झालता .त्यांच्या जन्मदिवसानिमित्त 1 जुलै या रोजी महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो .

महाराष्ट्र कृषी दिनाला विशेष महत्व आहे .आजच्या दिवशी शेतकऱ्यांच्या कामगिरीला प्रोत्साहन दिले जाते .बळीराजा धान्य पिकवतो म्हणून अन्न मिळते .त्यामुळे कृषिदिनानिमित्त या बळीराजाच्या कामगिरीला गौरवले जाते .आजच्या दिवशी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते .हा दिवसाला खूप महत्व दिले जाते . शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी आजच्या दिवस त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देतो .

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!