मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये घेण्याबाबत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आता येत्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या सुनावणीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार हे ठरणार आहे.
