Mandatory ABS On All Two‑Wheelers India : ABS सिस्टीम बाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, नक्की काय आहे ही सिस्टीम?

249 0

Mandatory ABS On All Two‑Wheelers India : भारतामध्ये मागच्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातही अपघातांमध्ये दुचाकी वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. अशातच भारतातल्या सगळ्याच दुचाकी वाहनांमध्ये ABS म्हणजेच अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम अनिवार्य होणार आहे. एक जानेवारी 2026 पासून हा नियम सरकार लागू करण्याचा विचार करत आहे. नक्की काय आहे हा नियम? ABS म्हणजे काय? चला जाणून घेऊया सविस्तर माहिती…

85 Year Old Man Marriage Scam : पुण्यात 85 व्या वर्षी पत्नी शोधणाऱ्या वृद्धाला लाखोंचा गंडा

रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय यांच्या वतीने या संदर्भात लवकरच अधिसूचना जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरंतर दुचाकी वाहनांचा होणारा अपघात रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 150 CC आणि त्याहून आधीक CC मॉडेल करिता ABS सिस्टीम अनिवार्य करण्यात आली होती. मात्र आता सर्रास सगळ्याच गाड्यांमध्ये ABS सिस्टीम (Mandatory ABS On All Two‑Wheelers India )लागू होण्याची शक्यता आहे.

नक्की काय आहे ÀBS सिस्टीम? (Mandatory ABS On All Two‑Wheelers India )

ABS म्हणजे अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, या सिस्टीम मुळे गाडी घसरण्यापासून थांबवते. ज्या दूचाकी मध्ये ही सिस्टीम आहे ती दुचाकी कितीही स्पीड मध्ये असली तरी अचानक ब्रेक लावल्यानंतर घसरत नाही. ABS फीचर मुळे ब्रेक लावताना चाक लॉक होण्यापासून थांबवते आणि वाहन चालकाला कोणतीही जीवित हानी होत नाही. याबरोबरच बाईकच्या स्क्रीनवर एक इंडिकेटर येतो. ज्यामुळे ABS सिस्टीम योग्यरीत्या काम करत आहे की नाही हे स्पष्ट होते.

काय आहेत ABS चे फायदे?

अचानक ब्रेक लावला तरीही वाहन कंट्रोल मध्ये राहते

जास्त स्पीडने ब्रेक लावल्यावरही बाईक घसरत नाही.

इमर्जन्सी मध्ये ब्रेक लावताना बाईकच्या हँडलवर कंट्रोल ठेवण्यास मदत होते.

वाहनाची चाके लॉक होत नाहीत आणि वाहन कंट्रोल करता येते.

बाईकचे टायर खराब होण्याची शक्यता कमी असते.

बाईकचा स्पीड नियंत्रित पद्धतीने कमी होण्यास मदत होते.

TOP NEWS MARATHI : SANDIP DESHPANDE ON MARATHI MLA STATEMENT: मी व्यक्ती नाही, वृत्तीला षंढ बोललो

काय सांगते आकडेवारी?

2022 मध्ये सादर झालेल्या आकडेवारीनुसार भारतात 1,51,997 रस्ते अपघात झाले आहेत ज्यामध्ये 20% अपघात हे दुचाकी वाहनांमुळे झाले आहेत. वाहनांच्या विक्री बाबत सांगायचं झाल्यास मागील आर्थिक वर्षामध्ये 75 सीसी ते 125cc इंजिन असणाऱ्या मोटरसायकल मॉडेलची हिस्सेदारी ही दोन तृतीयांश होती. त्यानंतर विक्रीमध्ये 4.6% वाढ होऊन ती 9.26 मिलियन इतकी झाली आहे. याच काळामध्ये स्कूटरची विक्री 17% वाढून 6.85 मिलियन युनिट झाली आहे. एकूण काय तर ABS सिस्टीमला अनिवार्य बनवणाऱ्या नियम अशा लोकांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल जे लोक दररोज टू व्हीलर ने प्रवास करतात.

ABS सिस्टीम प्रत्येक वाहनामध्ये अनिवार्य केल्यास वाहन चालकाची सुरक्षितता वाढू शकते हे नक्की! मात्र गाड्यांच्या किमती देखील त्यामुळे वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारच्या मते वाहन चालकांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. सध्या इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी

Share This News
error: Content is protected !!