एक मोठी बातमी समोर आली असून वाल्मीक कराडला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर दोन कोटीच्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराडचा या हत्यात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर वाल्मीक कराड हा फरार झाला.
आधी बीडचे पोलीस आणि नंतर सीआयडीचं पथक वाल्मीक कराडचा शोध घेत होतं. हा शोध अखेर थांबला कारण वाल्मीक कराड स्वतः सीआयडी ला शरण आला. त्यानंतर तब्बल 5 तास त्याची CID चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर वाल्मीक कराडला केज न्यायालयात हजर आलं
केज न्यायालयात काय झालं?
31 डिसेंबर 2024 रोजी दुपारी सव्वा बारा वजता वाल्मीक कराडा पुण्यातील पाषाण रस्त्यावर असणाऱ्या गुन्ह्यान्वेक्शन विभाग अर्थात सीआयडीच्या कार्यालयात दाखल झाला त्यानंतर त्याची तब्बल पाच तास चौकशी झाली आहेत मग त्याला केज न्यायालयात हजर करण्यात आलं केज न्यायालयात हजर करताच वाल्मीक करारावर दाखल करण्यात आलेला खंडणीचा गुन्हा हा राजकीय द्वेषापोटी दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद वाल्मीक कराडच्या वकिलांनी केला तर खंडणी आणि हत्या या दोन प्रकरणांचा एकमेकांशी कनेक्शन असून फरार असणाऱ्या सुदर्शन घुलेचा शोध लागावा यासाठी वाल्मीक ला पंधरा दिवसांची कोठडी देण्याची मागणी सीआयडी कडून करण्यात आली आणि वाल्मीक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी खोटावण्यात आली आहे.