मुंबई : पहलगाम (PAHALGAM) दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे ५० लाखांची आर्थिक मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीच्या सुरुवातीला पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना सांत्वनपर ५० लाखांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कुटुंबियांना आधार देण्यासाठी घरातील एका व्यक्तीला रोजगार आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला.
पीडित जगदाळे कुटुंबातील मुलीला नोकरी दिली जाणार आहे. राज्य मंत्रीमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला; महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू
Youtube ची मोठी कारवाई ! भारतातील 22 लाखांहून अधिक व्हिडिओ हटवले
जे विमानात कधीही बसले नाहीत, त्यांना एकनाथ शिंदेंनी आणले – खासदार नरेश म्हस्केंचे वादग्रस्त विधान