मंत्रिमंडळात भाजपाचं धक्कातंत्र; ‘या’ चार दिग्गज माजी मंत्र्यांचा पत्ता कट

808 0

राज्यात 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा (VIDHANSABHA ELECTION) निकाल लागला असून 232 जागांसह महायुतीला (MAHAYUTI) स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS) यांनी मुख्यमंत्रीपदाची (CHIEF MINISTER) तर एकनाथ शिंदे (EKNATH SHINDE) अजित पवार (AJIT PAWAR)यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (DEPUTY CHIEF MINISTER) शपथ घेतली.

त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपुरात होत असून या विस्तारात भाजपाचा धक्का तंत्र पाहायला मिळतंय चार माजी मंत्र्यांचा पत्ता कट करत भाजपानं नव्या चेहऱ्यांना संधी द्यायचं ठरवलं आहे.

‘या’ 4 माजी मंत्र्यांचा पत्त्ता कट 

आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातून भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विजयकुमार गावीत,  सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण या मंत्रांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

‘या’ नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

भाजपाकडून मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांच्या यादीत आकाश फुंडकर, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, संजय सावकारे, नितेश राणे, अशोक उईके, जयकुमार गोरे या नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.

रवींद्र चव्हाण यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत

डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांचं मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्यानंतर महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागेल अशा चर्चां सुरू झाल्या आहेत. रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार झाले असून या अगोदर ते सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते.

CABINET FORMATION: ठरलं! 35 जण घेणार मंत्रीपदाची शपथ; वाचा संपूर्ण यादी

Share This News
error: Content is protected !!